Vikas Bharati Community Radio Station, 90.08 FM

Dr.Hedgewar Seva Samiti,Krishi,Vigyan Kendra,Nandurbar

Vikas Bharati Community Radio Station,90.08 FM

 

Community radio stations in India are low-power radio stations, operated and owned by local communities, providing a platform for local voices and serving the educational, developmental, social, and cultural needs of the community. 

नंदुरबार जिल्हा प्रामुख्याने आदिवासी जिल्हा. जिल्ह्यात 69% लोकसंख्या आदिवासी आहे. आदिवासी परंपरा आणि संस्कृती ने हा जिल्हा तसा समृद्ध आहे.परंतु शिक्षण, बालविवाह,कुपोषण,रोजगार आणि त्यासाठी होणारे स्थलांतरण या येथील प्रमुख समस्या आहेत.

१ जुलै १९९८ ला धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला.म्हणजे आज नंदुरबार जिल्हा होऊन २५ वर्षे झाली आहेत. परंतु या २५ वर्षांत नंदुरबार जिल्ह्यातील श्रोत्यांना त्यांच्या हक्काचे रेडिओ स्टेशन मात्र नव्हते. नेमकी हीच बाब डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी लक्षात घेऊन विकास भारती सामुदायिक रेडिओच्या रुपात सूचना आणि प्रसारण मंत्रालय,नवी दिल्ली, भारत सरकारच्या मान्यतेने जिल्ह्यातील पहिल्या कम्युनिटी रेडी केंद्राची स्थापना केली. यासाठीराष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण बँक नाबार्डचेही आर्थिक सहकार्य लाभलेआहे. जिल्ह्यातील वंचित घटक जो मेनस्ट्रीम मीडिया पर्यंत पोहचू शकत नाही अशा घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, कृषि, कला, संस्कृती, शिक्षण आणि समाजातील इतर ज्वलंत प्रश्न कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून मांडणे हा कम्युनिटी रेडिओ केंद्राचा उद्देश आहे.

२४/१०/२०२१ पासून जिल्ह्यातील विकास भारतीच्या प्रसारणाला सुरुवात झाली.कृषि विज्ञान केंद्र कोळदा, नंदुरबारच्या कृषि तज्ञांद्वारे कृषि विषयक माहिती, शासकीय योजणांची माहिती, हवामान अंदाज व कृषि सल्ला, विविध क्षेत्रात कार्यरत तज्ञ व शासकीय अधिकारी यांची भाषणे, मुलाखती, संदेश हे सध्या, सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचवण्यात येतात.FM बँड ९०.MHz वर सकाळी ७ ते सकाळी १०:०० वाजेपर्यत प्रथम प्रसारण व सायंकाळी ४:०० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंतपुनःप्रसारण हेसुरु असून दररोज विविध विषयांवर १२ प्रकारचे कार्यक्रम या केंद्रावरून प्रसारित केल्या जातात.याचा लाभ जिल्ह्यातील १५ ते २० किलोमीटर परिघात ६०ते६५ गावांना होत असून. इंटरनेट आणि मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून जगभर कुठेही हे प्रसारण ऐकण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

कृषि विज्ञान केंद्राच्या परिसरात विकास भारतीचे अद्ययावत ध्वनिमुद्रण , संकलन आणि प्रसारण कक्ष असून याच ठिकाणाहून कार्यक्रम निर्मिती आणि प्रसारण केले जाते. काही प्रासंगिक कार्यक्रम, मुलाखती, प्रतिक्रिया इ. ध्वनिमुद्रित करण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन त्या त्या घटकाला कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा नेहमी प्रयत्न असतो.स्थानिक कलाकार, विविध शासकीय विभाग आणि त्यांच्या योजना, जिल्ह्यातील इतर स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून कार्यक्रम निर्मिती सुरु असून, युनिसेफ, Centre for Behavior change communication(SBC3),मुंबई, स्मार्ट संस्था दिल्ली, बिल गेट्स फौंडेशन, आयडीसिंक मीडिया दिल्ली,आयुष मंत्रालय भारत सरकार,सेमका,राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टीलायझर लिमिटेड,Directorate of Advertising & Visual Publicity, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन,मंत्रालय,मुंबई.   

इत्यादी संस्थांसोबत जनजागृती प्रकल्प राबून विकास भारतीचा लोकल टू ग्लोबल हा प्रवास सुरु आहे.